Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » माजी खा जैन याची २४.६३ कोटी रूपयात नाशिकच्या व्यावसायिकाकडू  फसवणूक ; पाच जणांवर गुन्हा
    क्राईम

    माजी खा जैन याची २४.६३ कोटी रूपयात
    नाशिकच्या व्यावसायिकाकडू  फसवणूक ; पाच जणांवर गुन्हा

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 28, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: नाशिक येथील व्यवसायिक यांनी जळगाव येथील नामांकित सराफ व्यवसायिक व माजी खा ईश्‍वरलाल जैन याच्या कडून व्यवसायाचे कारण सांगून उसनवार २४ कोटी ६३ लाख १६ हजार रूपये घेतले ते परत न करता त्याची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याचप्रमाणे पैसे परत करण्यासाठी बनावट ॲग्रीमेंट तयार केल्याचे देखील उघड झाले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात नाशिक येथील अशोक बांधकाम व्यवसायिकासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नाशिकच्या अशोक बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स कंपनीचे मालक अशोक मोतीलाल कटारीया आणि जैन यांचे अनेक वर्षांपासून कौटुंबिक संबंध आहेत. कटारिया यांनी जैन यांना व्यवसाय करण्याची गरज सांगून सन २०१०-११ व २०१४-१५ दरम्यान वेळोवेळी  ११ कोटी आणि १७ कोटी ६३ लाख ८० हजार २१० रूपये असे एकुण उसनवारीने घेतले. यातील काही रक्कम कटारिया यांनी परत केली. ६ कोटी ९९ लाख ३६ हजार ७४१ आणि १७ कोटी ६३ लाख ८० हजार २१० असे एकुण २४ कोटी ६३ लाख १६ हजार ९५१ रूपये कटारिया यांच्याकडे बाकी होते. त्यानंतर २ ऑक्टोबर २०१५ रोजी कटारिया हे राजेंद्र चिंधुलाल बुरड, स्नेहल सतीष पारख उर्फ स्नेहल मंजीत खत्री यांना सोबत घेवून सराफा बाजारातील कार्यालयात आले. त्यावेळी त्यांनी पैसे परत करण्याची पुन्हा मुदत वाढ मागितली. यासाठी कटारिया यांनी जैन यांना एक जॉइंट व्हेंचर अॅग्रीमेंट करुन घेण्याचे सांगीतले. त्या कागदपत्रांवर जैन यांनी सह्या केल्या. त्यानंतर मानराज मोटर्स यांना पैसे देण्याचे सांगून जैन यांनी पुन्हा कटारिया यांच्याकडे पैश्यांची मागणी केली. दरम्यान कटायिा यांनी ज्या जमिनीबाबत कागदपत्र तयार केले होते. त्या जमिनीचा नाशिक न्यायालयात वाद सुरू आहे. त्याचा निकाल प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. त्या कागदपत्राच्या आधारे जैन यांची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर जैन यांनी शनिपेठ पोलीसात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून न नाशिकच्या अशोक बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स कंपनीचे मालक अशोक मोतीलाल कटारीया, राजेंद्र चिंधुलाल बुरड, स्नेहल सतीष पारख उर्फ स्नेहल मंजीत खत्री, आशीष अशोक कटारीया, सतीष धोंडूलाल पारख (सर्व रा. नाशिक) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक बळीराम हिरे तपास करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सोनसाखळी चोरीचा उलगडा : रावेर गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात दोन सराईत चोर !

    December 4, 2025

    संतापजनक : सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार : शाळेच्या सीसीटीव्हीट घटना कैद !

    December 4, 2025

    धक्कादायक : चार चिमुकल्यांचा खून एकाच पद्धतीने; आईच्या कबुलीनं थरकाप!

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.