• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पक्षाच्या चिन्हासह अजित पवारांनी दिला सरकारला पाठींबा !

editor desk by editor desk
July 2, 2023
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
पक्षाच्या चिन्हासह अजित पवारांनी दिला सरकारला पाठींबा !

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्यात नुकतेच शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर, अजित पवार यांनी रविवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी सरकारबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचे अजित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे.

हे सरकार आहे, त्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बहुसंख्य आमदारांनी जाण्याचा निर्णय घेतला. राज्यपाल महोदयांनी आम्हाला शपथ दिली. अजूनही मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. त्यातही इतरांना मंत्रिपदे मिळणार. अनेक दिवस चर्चा सुरू होती. देशपातळीवरील राजकीय परिस्थिती, राज्याची परिस्थिती बघता विकासाला महत्व दिलं पाहिजे असं माझं आणि सहकाऱ्यांचं स्पष्ट मत आलं. अतिशय मजबुतीने देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न मोदीसाहेब करत आहे. त्यामुळे आपणही त्यांना पाठिंबा दिला पाहिजे असं आम्हाला वाटलं. शुक्रवारी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. पक्षाच्या वर्धापन दिनाला भूमिका मांडली होती. इथून पुढे तरुणांना संधी देणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या प्रांतात नवे कार्यकर्ते पुढे आणले पाहिजे तसा आमचा प्रयत्न आहे. जर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपसोबतही जाऊ शकतो. बहुतांश नेत्यांना माझा निर्णय मान्य. पक्षाचे चिन्ह व नाव आमच्याकडेच, आम्ही पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढवू. पक्ष अधिक मजबूतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करणार. सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. राज्यातील प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला सकारात्मकतेने काम करणे गरजेचे आहे. आज अतिशय मजबुतीने देशाचं नेतृत्व मोदींच्या हातात आहे, हे नाकारता येणार नाही. विकासाच्या प्रश्नावर ताबडतोब निर्णय घेणे गरजेचे आहे. जर मोदीच 2024 मध्ये पंतप्रधान होणार असतील तर आपण त्यांच्यासोबत गेले पाहिजे. आपण सरकारला मदत केली पाहिजे. उगाच रस्त्यावर भांडून प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला. अनेक जण आरोप करतात केसेसमुळे गेले. शपथ घेतलेल्यांपैकी अनेकांवर केसेस नाही. उगीच कुणीतरी आमच्यावर आरोप करू नये. आम्ही आमचा निर्णय घेतला आहे. तुम्ही तुमचे काम करा. आम्ही सरकारसोबत राहुन जनतेचे प्रश्न सोडवू.

Previous Post

अखेर जळगावच्या संजय पवारांची ‘ती’ जाहिरात ठरली खरी !

Next Post

विहिंपच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला धर्म परिवर्तन करण्याचा डाव !

Next Post
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !

विहिंपच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला धर्म परिवर्तन करण्याचा डाव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group