• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पंतप्रधानांच्या तोडीचा एकही नेता सध्या जगात नाही ; फडणवीस !

editor desk by editor desk
July 1, 2023
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
पंतप्रधानांच्या तोडीचा एकही नेता सध्या जगात नाही ; फडणवीस !

औरंगाबाद : वृत्तसंस्था 

कोरोना लस तयार करणे भारतासाठी मोठे यश आहे. लस घेण्यासाठी भारतीय नागरिकांना एक रुपयाही द्यावा लागला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला भरभरून दिले आहे. सध्या चार लाख कोटींची कामे महाराष्ट्र सुरू असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोडीचा एकही नेता सध्या जगात नाही, असा दावा देखील त्यांनी केला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी टीका केली. राहुल गांधी परदेशात जाऊन देशाची बदनामी करत असल्याचे ते म्हणाले. मात्र, राहुल गांधी यांना अमेरिकेच्या वाईट हाऊसनेच प्रत्युत्तर दिले असल्याचे देखील ते म्हणाले.

गंगापूर तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या 1075 कोटी रुपयांच्या ‘हर घर नल’ योजनेच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गंगापूर शहरात आले होते. गंगापूर तालुक्यातील 209 गावांसह त्या गावांमधील वाड्या, वस्त्यांवर डिसेंबर 2023 अखेरपर्यंत प्रत्येक घरात नळ देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या योजनेचा शुभारंभा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.
देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. महिलांनो एसटी महामंडळात तुम्हाला अर्धे टिकीट आहे, त्यामुळे बाहेरचे काम करायला आता तुम्ही जात जा, असा सल्ला देखील त्यांनी दिला. सर्वसामान्य महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार कटीबद्ध असल्याचे ते म्हणाले.
आवास योजनेमध्ये ओबीसी समाजाचा समावेश नव्हता, त्यामुळे ओबीसी समाज या संदर्भात सातत्याने मागणी करत होता. त्यामुळेच ओबीसी समाजाला न्याय देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने मोदी घरकुल योजना सुरू केली. या माध्यमातून ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काचे घर देण्याचे काम आमच्या सरकारने केले असल्याचे ते म्हणाले.
पश्चिम वाहिनी नद्यांचे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि तो आम्ही पूर्ण करणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. या माध्यमातून मराठवाड्याला त्यांच्या हक्काचे पाणी मिळणार असल्याचे देखील ते म्हणाले.

Previous Post

विजेचा शॉक लागून मजूराचा मृत्यू !

Next Post

वसंतवाडीच्या मराठी शाळेत वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात !

Next Post
वसंतवाडीच्या मराठी शाळेत वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात !

वसंतवाडीच्या मराठी शाळेत वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group