• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भाजपच्या केद्रीय मंत्र्यांनी काढली उद्धव ठाकरेंची लाज !

editor desk by editor desk
June 20, 2023
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
भाजपच्या केद्रीय मंत्र्यांनी काढली उद्धव ठाकरेंची लाज !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

राज्यात नुकताच ठाकरे व शिंदे गटाच्या शिवसेनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी दोन्ही गटाकडून एकमेकाच्या विरोधात टीका करीत हा दिवस साजरा केला तर यात आता भाजपचे केद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी उडी घेत ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लाज काढली आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
वर्धापन दिन मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली. “केंद्रात हिंदूत्ववादी विचारांचे सरकार असतानाही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदूंना आक्रोश करावा लागत आहे. आक्रोश मोर्चे निघत आहेत. हिंदूंची फसगत झाली आहे. केंद्रातील भाजपा सरकार देश चालवायला लायक नाही हेच त्यावरून स्पष्ट होते. डबल इंजिन सरकार केवळ हवेतच वाफा सोडत असून राज्यातही गद्दार आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या भाजपच्या छाताडावर पुन्हा भगवा फडकावणारच”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेच्या वर्धापन दिनी ठाकरे गटाकडून आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी केंद्रातील मोदी सरकारवर परखड शब्दांत हल्लाबोल केला. डबल इंजिनचं सरकार फक्त हवेत वाफा सोडतंय असा टोलाही उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला. यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून उद्धव ठाकरेंच्या भूमिकांवर भाजपाकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. यासंदर्भात मुंबईत माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केली आहे. तसेच, पालघरमधील घटनेचा उल्लेख करून त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “उद्धवजी ठाकरे, आता तरी सत्याचा सामना करा. आख्ख्या जगानं मान्य केलंय की जगातल्या १६० देशांना औषध व लस पोहोचवण्याचं काम भारतानं केलंय. देशात २२० कोटी लसी मोफत देण्याचं काम मोदींनी केलं आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच पुढाकाराने जेव्हा निधीची तरतूद केली गेली, आपल्या वैज्ञानिकांना प्रेरणा दिली गेली, तेव्हा कुठे ही लस तयार झाली. तेव्हा तर तुम्ही खोलीत बसला होतात. घाबरत होता. मुंबई आणि महाराष्ट्राच्या जनतेला विसरले होता”, असा टोला अनुराग ठाकूर यांनी लगावला आहे.

 

Tags: #bjp#shivsena#udhavthaakre
Previous Post

मुलीकडे जाणे पडले महागात ; चोरट्यांनी केले घर साफ !

Next Post

पालकमंत्री पाटलांना कोर्टाने दिला दणका ; इतका झाला दंड !

Next Post
पालकमंत्री पाटलांना कोर्टाने दिला दणका ; इतका झाला दंड !

पालकमंत्री पाटलांना कोर्टाने दिला दणका ; इतका झाला दंड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group