धरणगाव : प्रतिनिधी
शहरातील कोर्ट परिसरातून ५० वर्षीय व्यक्तीची दुचाकी अनोळखी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील भाटीया गल्लीतील शेतकरी श्यामसुन्दर रमेश काबरा(वय ५०) हे दि. ०३ जून रोजी शहरातील कोर्ट बाजार परिसरात आले असता. त्यांची दुचाकी क्र.एम.एच.१९.सी.क्यू.०८९३ हि सुमारे ५० हजार रुपये किमतीची अनोळखी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर त्यांनी धरणगाव पोलिसात फिर्याद देत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.उमेश पाटील हे करीत आहेत.