Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भादली रेल्वे स्टेशनजवळील भुयारी मार्ग लवरकच पुर्ण होणार- राष्ट्रवादीचे पंकज महाजन यांची माहिती
    जळगाव

    भादली रेल्वे स्टेशनजवळील भुयारी मार्ग लवरकच पुर्ण होणार- राष्ट्रवादीचे पंकज महाजन यांची माहिती

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 19, 2021Updated:October 19, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज। जळगाव तालुक्यातील भादली रेल्वे स्टेशन जवळील गेट हे तीन वर्षापासून भुयारी मार्गाच्या कामासाठी बंद आहे. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन यांनी रेल्वे प्रशासनाकडे भुयारी मार्गासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. याला रेल्वे प्रशासनाने मंजूरी दिली असून लवकरच भुयारी मार्गाचे कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती पंकज महाजन यांनी आज मंगळवार १९ ऑक्टोबर रोजी दुपारी पत्राद्वारे कळविले आहे.

    भादली रेल्वे स्टेशन जवळील गेट नंबर १५३ गेल्या तीन वर्षापासून भुयारी मार्गाचे कामासाठी बंद आहे. गेट बंद असल्याने रेल्वे लाईनच्या फार शेती असलेल्या असंख्य शेतकऱ्यांना फार मोठ्या संकटांना संकटांचा सामना करावा लागत आहे लक्षात घेता राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नशिराबाद तर्फे रेल्वे विभाग भुसावळ येथील महा रेल प्रबंधक यांच्या कार्यालयात भुयारी मार्गाचे काम करण्याकरिता करण्यासाठी पाठपुरावा सातत्याने सुरू होता. अखेर रेल्वे विभाग भुसावळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी बांधकाम यांनी पंकज महाजन यांना लेखी पत्र देऊन २५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत काम सुरू होऊन होऊन मार्च २०२२ पर्यंत सदरचे काम पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. मध्य रेल्वे बांधकाम विभागातर्फे मिळालेल्या लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील वर्षीच्या हंगामात आपला जवळचा रस्ता रहदारी उपलब्ध होणार असल्याने शेतकरी आशावादी झालेला आहे. सदर पत्र मिळाल्याचे आतापर्यंत केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. भादली रेल्वे गेट बंद असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यास भादली सब स्टेशनकडील गेट नंबर १५२ च्या रस्त्याने शेतात जावे लागत आहे. त्यासाठी त्यांना अधिकचे दोन ते तीन तास लागत आहेत. त्याचा परिणाम शेतात काम करण्यावर होत असून उत्पादनात घट होत आहे. बैलांना सुद्धा अधिक श्रम करावे लागत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    बुलढाण्यात बोगस मतदानाचा आरोप; आमदारांच्या मुलाकडून पोलिसांना धमकी !

    December 2, 2025

    जळगाव जिल्ह्यात जमावबंदी लागू; 3 डिसेंबरपर्यंत कडक बंदोबस्त !

    December 2, 2025

    नगर परिषद, नगर पंचायतीचा निकाल पडणार लांबणीवर !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.