Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव जिल्ह्याला पाणी टंचाई ; इतक्या गावांना टँकरद्वारे होतोय पाणीपुरवठा..!
    जळगाव

    जळगाव जिल्ह्याला पाणी टंचाई ; इतक्या गावांना टँकरद्वारे होतोय पाणीपुरवठा..!

    editor deskBy editor deskMay 25, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    तापमानात वाढीमुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्पातील जलसाठाही कमी होत आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात आणखी ४ गावांत पाणी टंचाई जाणवत आहे. पूर्वी १४ गावांमध्ये १६ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत होता. आता १८ गांवात २० टँकरने पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहे.

    अल निनोमुळे जिल्हाभरात उष्णतेची लाट जाणवत आहे. वाढत्या उन्हासोबत पाणीटंचाईचेही संकट जिल्हावासीयांवर उभे राहिले आहे. यंदा पावसाळा एक महिना उशिराने येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

    १८ गावांमध्ये २० टँकर

    जामनेर तालुक्यातील मोरगाव, रोटवद, किन्ही, नेरी दिगर येथे चार टँकर, भडगाव तालुक्यातील तळबंद तांडा, वसंतवाडी दोन टँकर, बोदवड तालुक्यातील एनगाव एक टँकर, पारोळा तालुक्यातील हनुमंतखेडा, खेडीडोक येथे दोन टँकर चाळीसगाव तालुक्यातील मौजे पिंपळगाव, विसापूर, रोहीणी, अंधारी, हातगाव येथे ६ टँकर, भुसावळ तालुक्यातील रामेश्वर आणि पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे तीन टँकर, अशा एकूण १८ गावांत २० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

    पाणीसाठ्यात घट
    तापमान वाढीमुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असून, पाणीसाठ्यात घट होत आहे. वापूर धरण वगळता इतर धरणांतील साठा निम्म्यापेक्षा कमी झाला आहे. यामुळे भविष्यात तीव्र पाणीटंचाई जाणवेल. जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या गिरणा धरणातील साठाही गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा टक्यांनी घटला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी गिरणा धरणात ३८.०१ टक्के साठा होता. यंदा मात्र त्यात घट झाल्याने तो आता २४.३० टक्के झाला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ५३ वर्षीय इसमाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने परिसरात खळबळ !

    February 21, 2026

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.