• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

लग्नाच्या दिवशी नवरदेवाच्या प्रेमाची झाली वाच्यता ; नवरी सोडून प्रेयसीशी लागले लग्न !

editor desk by editor desk
May 4, 2023
in क्राईम, राज्य
0
लग्नाच्या दिवशी नवरदेवाच्या प्रेमाची झाली वाच्यता ; नवरी सोडून प्रेयसीशी लागले लग्न !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

लग्नासाठी तरूणीच्या घरी वरात घेऊन पोहोचलेल्या नवरदेवाच्या प्रेम प्रकरणाचा अचानक खुलासा झाला. त्यानंतर लग्नात वाद पेटला होता. अशात नवरदेवाचं त्याच्या प्रेयसीसोबत लग्न लावून देण्यात आलं. हैराण करणारी बाब म्हणजे नवरदेवाची प्रेयसी दुसरी कुणी नसून त्याची होणारी मेहुणीच निघाली. दोन्ही परिवाराच्या सहमती त्यांचं लग्न लावून देण्यात आलं. बिहारच्या सारण जिल्ह्यात एका लग्नात चांगलाच गोंधळ झाला.

ही घटना भभौली गावातील आहे. गावात राहणाऱ्या रामू बीनची मुलगी रिंकू कुमारीचं लग्न छपरा शहरातील राजेश कुमार याच्यासोबत जुळलं होतं. 2 मे रोजी त्यांचं लग्न होणार होतं. नवरदेव ठरल्यानुसार वरात घेऊन आला. पण पुढे जे झालं ते सगळ्यांना हैराण करणारं ठरलं. 2 मे रोजी नवरदेव बॅंडबाजासहीत वरात घेऊन रिंकु कुमारीच्या घरी पोहोचला. मुलीकडील लोकांनी वरातीचं स्वागत केलं आणि लग्नाचे रितीरिवाज सुरू केले. द्वारपूजेनंतर रिंकू आणि राजेश यांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले.

पण यानंतर कहाणीमध्ये ट्विस्ट आला. नवरीची लहान बहीण पुतुल कुमारीने आपला होणारा भाओजी म्हणजे नवरदेवाला फोन केला आणि फोनवर धमकी दिली की, जर तू माझ्या बहिणीसोबत लग्न केलं तर ती छतावरून उडी मारून आपलं जीवन संपवेल. यानंतर घाबरलेल्या नवरदेवाने परिवाराला सगळं सत्य सांगितलं.

त्यानंतर लग्न मंडपात तणावाचं वातावरण तयार झालं. वाद इतका वाढला की, वरातीतील लोकांमध्ये आणि मुलीकडील लोकांमध्ये हाणामारीही झाली. गावातील लोकांनी याची सूचना पोलिसांना दिली. पोलिसांनी दोन्ही परिवारांना समजावून सांगितलं. त्यानंतर राजेशचं लग्न रिंकूसोबत नाही तर पुतुल कुमारीसोबत लावून देण्यात आलं.

असं सांगण्यात आलं की, पुतुल कुमारी आणि राजेश आधीच एकमेकांना ओळखत होते. राजेशचं लग्न पुतुल कुमारीची बहीण रिंकूसोबत ठरलं होतं. लग्न ठरल्यावर 2 मे रोजी लग्न होणार होतं. दुसरीकडे पुतुल कुमारी इंटरमीडिएटची परीक्षा छपरा येथील कॉलेजमध्ये देत होती. यादरम्यान पुतुल कुमारीची तिचा होणारा भाओजी राजेशसोबत सतत भेट होत होती. नंतर दोघे फोनवरही तासंतास बोलत होते. ज्यानंतर दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं. पण पुतुल कुमारी राजेशला आपल्या बहिणीसोबत लग्न करताना पाहू शकली नाही. ऐनवेळी तिने राजेशला फोन करून आत्महत्या करण्याची धमकी दिली. राजेश घाबरला आणि त्याने परिवाराला सगळं सत्य सांगितलं. दोन्ही परिवारांनी समजदारी दाखवत त्यांचं लग्न लावून दिलं.

Previous Post

राष्ट्रवादीत कार्यकर्त्यांना नव्हे तर घराणेशाहीला प्राधान्य ; भाजप नेत्याचा आरोप !

Next Post

नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केले सर्व काही मात्र लग्न दुसरीशी !

Next Post
नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केले सर्व काही मात्र लग्न दुसरीशी !

नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केले सर्व काही मात्र लग्न दुसरीशी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group