• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राष्ट्रवादीत कार्यकर्त्यांना नव्हे तर घराणेशाहीला प्राधान्य ; भाजप नेत्याचा आरोप !

editor desk by editor desk
May 4, 2023
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
राष्ट्रवादीत कार्यकर्त्यांना नव्हे तर घराणेशाहीला प्राधान्य ; भाजप नेत्याचा आरोप !

२ मे रोजी राज्यातील राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचा गोप्यस्फोट शरद पवार यांनी केल्यानंतर असंख्य कार्यकर्ते आक्रमक होत उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतर आता पक्षाध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. मात्र यावरून भाजपने राष्ट्रवादीला कोंडीत धरले आहे. शरद पवार यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा करू नये अशी इच्छा राष्ट्रवादीसह ठाकरे गटाने केली असली तरी, भाजपकडूनही त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी इच्छा व्यक्त केली होती.

मात्र त्यानंतर आज पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. त्यानंतर मात्र भाजपने आता राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. पवार कुटुंबीय हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर बाहेरची कोणतीही व्यक्ती बसू देणार नाहीत, त्यामुळे पवार कुटुंबीय घराणेशाही चालवत असल्याचा आरोप भाजपचे खासदार अनिले बोंडे यांनी केला आहे.

अनिल बोंडे म्हणले, राष्ट्रवादीमध्ये घराणेशाही आहे, त्यामुळे ते एका कुटुंबाशिवाय ते दुसऱ्याचा विचार करू शकत नाहीत. मात्र भाजपमध्ये एक सामान्य कार्यकर्ता अध्यक्ष होऊ शकतो. पण त्या त्या पक्षाची संस्कृती असते ती राष्ट्रवादीमध्ये आहे. माणसाला वयोमानानुसार व प्रकृतीनुसार मर्यादा असतात आणि हा सृष्टीचा नियम आहे. कोणामुळे कोणत्याच देशाचं, कोणत्याच राज्याचं,जनेतचं आणि कोणाचच, कोणामुळे काही विशेष फरक पडत नसतो.

थोड्या वेळापूरत ते निश्चित कमतरता जाणवेल परंतु नंतर लोकांना सवय पडून जाते. मी काही संजय राऊत नाही, की इतर पक्षात चाललेल्या घडामोडींवर मी प्रतिक्रिया द्यावी. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये म्हणतात ७५ वर्षानंतर व्यक्तीने वाणप्रस्ताश्रमामध्ये जावे. मात्र काही लोकांना एकादा माणूस माणूस हवाहवासा वाटत असला तरी त्याला निवृत्त होण्याचा अधिकार असतो आणि त्या दृष्टीने पाहायला गेले तर ती योग्यच गोष्ट असते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Previous Post

जळगावात रेल्वेतून पडून तरुण जखमी !

Next Post

लग्नाच्या दिवशी नवरदेवाच्या प्रेमाची झाली वाच्यता ; नवरी सोडून प्रेयसीशी लागले लग्न !

Next Post
लग्नाच्या दिवशी नवरदेवाच्या प्रेमाची झाली वाच्यता ; नवरी सोडून प्रेयसीशी लागले लग्न !

लग्नाच्या दिवशी नवरदेवाच्या प्रेमाची झाली वाच्यता ; नवरी सोडून प्रेयसीशी लागले लग्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group