Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुख्यमंत्र्याची आदित्य ठाकरेंवर टीका ; जन्मही नव्हता तेव्हापासून मी…
    राजकारण

    मुख्यमंत्र्याची आदित्य ठाकरेंवर टीका ; जन्मही नव्हता तेव्हापासून मी…

    editor deskBy editor deskApril 6, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नुकतीच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केल्यानंतर हि टीका मुख्यमंत्री शिंदे यांच्या जिव्हारी लागली असून आता त्यांनी थेट आदित्य ठाकरे यांचा जन्म काढल्याने राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु झाली आहे.
    मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कि, आदित्य ठाकरेचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी शाखाप्रमुख म्हणून काम करतोय. सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना आणि आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्यांना मी काय बोलणार? असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. एकनाथ शिंदे यांचा पक्ष नाही, तर ही चोरांची टोळी आहे. महाराष्ट्रात गुजरातचे मुख्यमंत्री बसले आहेत, अशी घणाघाती टीका बुधवारी ठाण्यात काढलेल्या महाविकास आघाडीच्या महामोर्चाच्या सभेत आदित्य ठाकरे यांनी केली. मी ठाण्यातून लढणार आणि जिंकून दाखवणार, असे खुले आव्हानच ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्यांच्या या आव्हानावर आता एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

    एकनाथ शिंदे म्हणाले, लोकशाहीमध्ये कोणालाही कुठेही उभा राहून निवडणूक लढवायचा अधिकार आहे. जनता ठरवते कोणाला निवडून द्यायचे कोणाला पाडायचे. मला त्यावर बोलण्याची गरज वाटत नाही. बोलणाऱ्याचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी शाखाप्रमुख म्हणून बाळासाहेबांच्या, दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेना उभी करण्यात माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. घरादारावर तुळशी पत्रक ठेवले. त्यामुळे सोन्याच्या चमचा घेऊन आले. आणि आयत्या पिठावर रेघोट्या ओढल्या त्यांच्यावर मी काय बोलणार? असा सवाल यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित करत आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

    आदित्य ठाकरे म्हणाले, पाठीवर वार करणाऱ्यांनी समोर येत लढावे, मी एकटा तुमच्याविरोधात लढण्यासाठी तयार आहे, हे राज्य छळमुक्त केल्याशिवाय राहणार नाही, तर माझ्या नादाला लागलात तर तुमचे नाव विसरायला भाग पाडेल. मी ठाण्यातून लढणार आणि जिंकून दाखवणार. गद्दारांच्या बद्दल लोकांच्या मनात संताप आहे, तो दिसून येतोय. मला प्रत्येक ठिकाणी लोक सांगताय तुमच्यासोबत आहे.

    #aaditythaakre #cmshinde
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आता माघार नाहीच : बच्चू कडूंनी सरकारला दिला अल्टिमेटम !

    October 29, 2025

    मतदार संघात जाऊन काम करा ; अजित पवारांची आमदारांना तंबी !

    October 29, 2025

    खळबळजनक : अमळनेरच्या तरुणाचा मृतदेह चंद्रपुर जिल्ह्यात आढळला !

    October 29, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.