Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आरोग्य : जेवण करतेवेळी मीठ खाताय होणार धोका !
    आरोग्य

    आरोग्य : जेवण करतेवेळी मीठ खाताय होणार धोका !

    editor deskBy editor deskMarch 17, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रत्येकाच्या जेवणातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मीठ…जेवणात जरा तरी मीठ कमी झालं तर जेवण बैचव लागतं. जेवणात मीठ कमी झालं तर आपण वरुन मीठ घेतो. काही लोकांना तर जेवण्याची चव न घेतातच त्या पदार्थावर आधीच मीठ घालतो. लहानपणापासून अनेकांनी हे वाक्य ऐकलं असेल अरे जास्त मीठ खाऊ नकोस रक्ताचं पाणी होतं. मिठाने जेवणाची चव तर वाढतेच शिवाय योग्य प्रमाणात मीठ खाल्ल्यास आपलं शरीर निरोगी राहतं. पण हेच मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यास आपल्या शरीरावर दृष्परिणाम होतात. हे दृष्परिणाम ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

    रक्तदाब वाढण्याचा धोका!
    जेवणात जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका निर्माण होतो. रक्तदाबामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. उच्च रक्तदाबामुळे दृष्टी कमी होऊ शकते, हृदयवरील ताण वाढतो त्यामुळे हृदयविराकाराच झटका येण्याची भीती उद्भवते.

    लठ्ठपणाची भीती
    तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण जेवणात जास्त मीठ खाल्ल्यामुळे लठ्ठपणाची समस्या होते. जास्त मीठ खाल्ल्यामुळे शरीरातील कॅलरीजचं प्रमाण वाढतं आणि तुमच्या शरीरातील चरबीही वाढते.

    किडनीवर परिणाम होण्याची भीती
    जास्त मीठ खाल्ल्यामुळे सोडियम शरीरात जातं. त्यामुळे मूत्रपिंडाला सोडियम पचविण्यासाठी अधिक कष्ट करावे लागते. याचा परिणाम किडनीच्या आरोग्यावर होतो.

    चेहरा आणि पायावर सूज
    तज्ज्ञांच्या मते जास्त मीठ खाल्लामुळे पायावर आणि चेहऱ्यावर सूज येते.

    वारंवार लघवी येणे
    जास्त मीठ खाल्ल्यामुळे अनेकांना वारंवार लघवीची समस्या जाणवते. UTI, टाइप 2 मधुमेह आणि अतिक्रियाशील मूत्राशय यासारख्या अनेक आजार हे जास्त मीठ खाल्ल्यामुळे होतात.

    सतत तहान लागणे
    जास्त मीठ खाल्ल्याने तुम्हाला बहुतेक वेळा तहान लागते. कारण सोडियम हे तुमच्या शरीराचं संतुलन बिघडवतं. त्यामुळे तुम्हाला सतत पाणी प्यावसं वाटतं.
    मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमकं दिवसभरात किती मीठ खायला हवं. तर WHO च्या मते, आपण आपण दररोज 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात सोडियम आणि पोटॅशियमचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. ‘डब्ल्यूएचओ’ कडून एका रिसर्च करण्यात आला ज्यानुसार लोक दररोज 9 ते 12 ग्रॅम मीठ खातात. जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दहावीच्या परीक्षेतील हिंसाचार: आरोपी अल्पवयीन, पोलिसांनी तत्काळ कारवाई केली

    March 17, 2026

    दिलासादायक : राज्यात होणार हजारो प्राध्यापकांची भरती ; मंत्री पाटील !

    March 17, 2026

    सभागृहात घडलेला वाद: आव्हाडांचे अपमानास्पद वक्तव्य, अध्यक्षांनी शेवटी दिला अंतिम समज

    March 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.