• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आरोग्य : जेवण करतेवेळी मीठ खाताय होणार धोका !

editor desk by editor desk
March 17, 2023
in आरोग्य, राष्ट्रीय
0
आरोग्य : जेवण करतेवेळी मीठ खाताय होणार धोका !

प्रत्येकाच्या जेवणातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मीठ…जेवणात जरा तरी मीठ कमी झालं तर जेवण बैचव लागतं. जेवणात मीठ कमी झालं तर आपण वरुन मीठ घेतो. काही लोकांना तर जेवण्याची चव न घेतातच त्या पदार्थावर आधीच मीठ घालतो. लहानपणापासून अनेकांनी हे वाक्य ऐकलं असेल अरे जास्त मीठ खाऊ नकोस रक्ताचं पाणी होतं. मिठाने जेवणाची चव तर वाढतेच शिवाय योग्य प्रमाणात मीठ खाल्ल्यास आपलं शरीर निरोगी राहतं. पण हेच मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यास आपल्या शरीरावर दृष्परिणाम होतात. हे दृष्परिणाम ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

रक्तदाब वाढण्याचा धोका!
जेवणात जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका निर्माण होतो. रक्तदाबामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. उच्च रक्तदाबामुळे दृष्टी कमी होऊ शकते, हृदयवरील ताण वाढतो त्यामुळे हृदयविराकाराच झटका येण्याची भीती उद्भवते.

लठ्ठपणाची भीती
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण जेवणात जास्त मीठ खाल्ल्यामुळे लठ्ठपणाची समस्या होते. जास्त मीठ खाल्ल्यामुळे शरीरातील कॅलरीजचं प्रमाण वाढतं आणि तुमच्या शरीरातील चरबीही वाढते.

किडनीवर परिणाम होण्याची भीती
जास्त मीठ खाल्ल्यामुळे सोडियम शरीरात जातं. त्यामुळे मूत्रपिंडाला सोडियम पचविण्यासाठी अधिक कष्ट करावे लागते. याचा परिणाम किडनीच्या आरोग्यावर होतो.

चेहरा आणि पायावर सूज
तज्ज्ञांच्या मते जास्त मीठ खाल्लामुळे पायावर आणि चेहऱ्यावर सूज येते.

वारंवार लघवी येणे
जास्त मीठ खाल्ल्यामुळे अनेकांना वारंवार लघवीची समस्या जाणवते. UTI, टाइप 2 मधुमेह आणि अतिक्रियाशील मूत्राशय यासारख्या अनेक आजार हे जास्त मीठ खाल्ल्यामुळे होतात.

सतत तहान लागणे
जास्त मीठ खाल्ल्याने तुम्हाला बहुतेक वेळा तहान लागते. कारण सोडियम हे तुमच्या शरीराचं संतुलन बिघडवतं. त्यामुळे तुम्हाला सतत पाणी प्यावसं वाटतं.
मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमकं दिवसभरात किती मीठ खायला हवं. तर WHO च्या मते, आपण आपण दररोज 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात सोडियम आणि पोटॅशियमचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. ‘डब्ल्यूएचओ’ कडून एका रिसर्च करण्यात आला ज्यानुसार लोक दररोज 9 ते 12 ग्रॅम मीठ खातात. जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे.

Previous Post

जळगाव ग्रामीण मतदार संघात ७० कोटीची कामे मंजूर !

Next Post

दोन मुलींचा पिता करीत होता लग्न अचानक समोर आली पहिली पत्नी !

Next Post
एका नवऱ्याची अजब वाटणी : दोन पत्नींना तीन- तीन दिवस !

दोन मुलींचा पिता करीत होता लग्न अचानक समोर आली पहिली पत्नी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group