Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चीन लॉकडाऊनच्या तयारीत ; आजाराने माजला हाहाकार !
    आरोग्य

    चीन लॉकडाऊनच्या तयारीत ; आजाराने माजला हाहाकार !

    editor deskBy editor deskMarch 11, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    गेल्या २०१९ मध्ये कोरोनाचे रुग्ण चीनमध्ये आढळून आल्यानंतर अख्या जगभर या आजाराने हाहाकार माजविला होता. त्यानंतर देशाने यावर कठोर पावले उचलत निर्णय घेतल्याने भारत काही प्रमाणात कोरोनापासून लवकर दूर झाला होता. त्यानंतर आता चीनमधील काही शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्याच्या तयारीत आहे. एकीकडे चीनमध्ये कोविडचे रूग्ण कमी होत असताना, दुसरीकडे फ्लूच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहेत. या कारणास्तव, चिनी अधिकारी काही शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करू विचारात आहेू. या निर्णयावर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. लोक म्हणतात की असे केल्याने कोविडच्या काळातील परिस्थिती निर्मान होईल.

    चीनच्या शिआन शहरात लॉकडाऊनबाबत आपत्कालीन योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, शहरातील संक्रमित क्षेत्रे बंद केली जाऊ शकतात. वाहतूकीमध्ये कपात करण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत. तसेच शॉपिंग मॉल्स, थिएटर, लायब्ररी, पर्यटन स्थळे आणि इतर गर्दीची ठिकाणेही बंद केली जाऊ शकतात. दरम्यान कोविड महामारीवेळी, चीनने जगातील सर्वात कडक कोविड निर्बंध लागू केले होते. ज्यामध्ये काही शहरांमध्ये अनेक महिने लॉकडाऊनचा समावेश करण्यात आला होता. शिआन शहरात डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान कडक लॉकडाऊन होतं. यावेळी अनेकांना अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होता. तसेच वैद्यकीय सेवेवरही परिणाम झाला.

    गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा ; नीती आयोगाचे आवाहन !
    गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा असं आवाहन करण्यात आले आहे. इन्फ्लूएंझाचा H3N2 विषाणू देशातील अनेक राज्यांमध्ये पसरला आहे. या विषाणूमुळे कर्नाटक आणि हरियाणामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. या संसर्गापासून बचाव करण्यासाठी निती आयोगाने गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. आयोगाने लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. हा संसर्ग टाळण्यासाठी लोकांना मास्क घालण्यास सांगितले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात या संसर्गाची ३ हजारांहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026

    मविआत राज्यसभा–विधान परिषद जागांवरून जागांवरून तणाव शिगेला; ठाकरे–काँग्रेसमध्ये रस्सीखेच

    February 20, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.