Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान !
    कृषी

    अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान !

    editor deskBy editor deskMarch 8, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    शहरातील व ग्रामीण भागातील होळीच्या सणाच्या दिवशी अवकाळी व वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. यामध्ये शेतकऱ्यांचे गहू, मका पिकाचे सर्वच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे.

    बाभळे, गारखेडा, आनोरा, धानोरा, धरणगाव, शिवार, गंगापुरी, पष्टाने, वंजारी, खपाट, पथराड, बोरखेडा, विवरे, भवरखेडे, हिंगोणे, कल्याणेहोळ, पिंप्री तसेच सर्वच धरणगांव तालुक्याला या अवकाळी पाऊस व वादळाचा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. आधीच कापसाचे भाव कमी असल्याने शेतकरी राजा नाराज होता. शेतकरी राजा हा दिवस – रात्र मेहनत करून आपल्या पिकाचे संगोपन करीत असतो रात्री – अपरात्री पाणी भरतो. थंडीच्या दिवसात आपल्या जीवाची परवा न करता त्या पिकाला लेकरासारखं वाढवतो. कापसाचे दुःख सावरत नाही तोवर कालच्या अवकाळी पावसाने शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. शेतकऱ्यांचा पिकांची झालेली हानी भरून निघावी. नुसते पंचनामे करून फायदा होणार नाही तर शेतकऱ्यांना ठोस मदत मिळायला हवी यासाठी सह संपर्कप्रमुख गुलाबरावजी वाघ व लोकनियुक्त नगराध्यक्ष धरणगाव तथा युवासेना जिल्हा प्रमुख जळगाव निलेश चौधरी, उपजिल्हा प्रमुख शरद माळी, शहर प्रमुख भागवत चौधरी नगरसेवक जितेंद्र धनगर नाना ठाकरे,विजय पाटील,हेमंत महाजन, परमेश्वर महाजन, महेंद्र महाजन, गजानन महाजन, महेश चौधरी, गोपाल पाटील, विलास पवार, संतोष महाजन, गोपाल महाजन, महेश चौधरी प्रेमराज चौधरी किरण अगदी चौधरी गणेश नारायण महाजन सुरेश महाजन बापू महाजन संजय भदाणे प्रकाश शिंपी नितीन कापुरे, सागर महाजन, मधुकर पाटील ,भरत चौधरी, संजय चौधरी वसीम खान, यांनी मागणी केली आहे.
    अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाचे त्वरित पंचनामे करा, असे आवेदन मा.तहसीलदार धरणगाव यांना दिले

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सोनसाखळी चोरीचा उलगडा : रावेर गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात दोन सराईत चोर !

    December 4, 2025

    धरणगांव : दहा हजारांची लाच घेताना अभियंता अटकेत !

    December 4, 2025

    विषबाधा झाल्याने ४७ वर्षीय महिलेचा दुर्देवी मृत्यू !

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.