Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावातील महिलांमध्येही क्षमता आहे फक्त व्यासपीठ मिळाले पाहिजे ; गौरी नाईक
    जळगाव

    जळगावातील महिलांमध्येही क्षमता आहे फक्त व्यासपीठ मिळाले पाहिजे ; गौरी नाईक

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 1, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मुंबई-पुणे सारख्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे महिला पुरुष हे आपलं आत्मविश्वास दाखवू शकतात मात्र रुलर भागातील शहरांमध्ये सुंदरता आत्मविश्वास हुशारी या सर्व गोष्टी असल्यावरही ते दाखवण्यात ते सक्षम नसतात त्यामुळेच हे व्यासपीठ आपण निर्माण केले आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण काही चेहरे सिलेक्ट करणार असून त्यांना चित्रपट वेबसाईट मिस्टर इंडिया मिसेस इंडिया असे व्यासपीठावर पाठवणार असल्याचे गौरा मिसेस मिस्टर खानदेश चे आयोजन करणाऱ्या गौरी नाईक यांनी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज शी चर्चा करताना सांगितले.

    खानदेश मॉल येथे आज गौरा मिसेस मिस्टर खान्देश या बॅनरखाली एक फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी मिसेस इंडिया रनअप राहिलेल्या गौरी नाईक यांनी महाराष्ट्र लाईव्ह चे प्रतिनिधी यांच्याशी वार्तालाप करताना सांगितले की आपण जळगाव ठिकाणी एक व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी हा प्रयत्न करीत आहोत महिला व पुरुषांमध्ये खूप टॅलेंट आहे मात्र तो दाखवता येत नाही त्यासाठी हे व्यासपीठ निर्माण करण्यात येत आहे.

    मुंबई दिल्ली बंगलोर या ठिकाणी जाऊन आपला टॅलेंट दाखवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा किंवा या ठिकाणी न जाता स्थानिक पातळीवर त्यांना व्यासपीठ मिळावे त्यासाठी हा सर्व प्रयत्न आहे लवकरच जळगाव मध्ये इन्स्टिट्यूट काढण्याचा मानस असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखविली. आत्मविश्वास मिळावा स्वतःकडील असलेले कलाकौशल्य दाखवण्यासाठी संधी मिळावी हे सर्व काही मांडले क्षेत्राशी निगडित आहे असे नाही हे सर्व क्षेत्रांशी संबंधित आहे विद्यार्थी महिला पुरुष याना मान सन्मान मिळवून देण्यासाठी हे व्यासपीठ आहे.

    स्वतःला होईल तितके सुदृढ बनवायचे आहे हा कोरोना पळून गेला पाहिजे जळगावात ही स्पर्धा आयोजित करण्याची दुसरी वेळ आहे.मी जरी पुण्याची असली तरी मी जलगावची असल्याचे वाटते.या स्पर्धात अनेक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला या स्पर्धांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करणे आहे. या स्पर्धेत काही चेहरे सिलेक्ट करणार असून त्यांना चित्रपट वेब सिरीज व दुसऱ्या स्पर्धांमध्ये व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याचे गौरी नाईक यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सोनसाखळी चोरीचा उलगडा : रावेर गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात दोन सराईत चोर !

    December 4, 2025

    धरणगांव : दहा हजारांची लाच घेताना अभियंता अटकेत !

    December 4, 2025

    विषबाधा झाल्याने ४७ वर्षीय महिलेचा दुर्देवी मृत्यू !

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.