प्रतिनिधी (भाईदास पाटील) धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे ब्राह्मण एक कुटुंब राहते गेल्या दोन-तीन दिवसापासून जोरदार पावसाने हजेरी लावलेली असल्याने काल मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घराची भिंत मागील बाजूस पडली यामुळे जीवित हानी झाली नाही मात्र ब्राह्मणे कुटुंब उघड्यावर आले आहेत.
सततधार पाऊसामुळे श्यामराव भागवत ब्राह्मणे (४५) यांच्या राहत्या घराची भिंत काल मध्यरात्री १.३० सुमारास कोसळली यात सुदैवाने संपूर्ण कुटुंब बचावले आहे.भिंत ही मागील बाजूस पडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेत श्यामराव भागवत ब्राह्मणे यांचे मोठे भाऊ रामभाऊ भागवत ब्राह्मणे व आई हे सुदैवाने दुर्घटनेतून बचावले. श्यामराव ब्राह्मणे यांची परिस्थिती गरिबीची आहे त्यातच घराची मातीची भिंत कोसळली यात ते हवालदिल झाले आहेत शासनाकडून भरपाई मिळावी अशी त्यांची मागणी आहे.
गेल्या आठवड्यात भरापासून सतत पाऊस सुरू आहे .काल रात्री देखील पावसाचा जोर कायम होता त्यातच ही घटना घडली सदर घटनेची पाहणी तलाठी घेसर विरेंद्र सोनकांबळे यांनी केली संपुर्ण घटनेचा तपशील पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालय धरणगाव येथे सादर करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. या वेळी सरपंच किरण गोकुळ पाटील उपसरपंच अजय तानकु ब्राह्मणे कोतवाल महिंद्र पाटील मुन्ना महाजन सिद्धार्थ ब्राह्मणे उपस्थित होते.