• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्ह्यातील अतिवृष्टीचे तातडीने पंचनामे करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 29, 2021
in अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, जळगाव, जामनेर, पाचोरा, पारोळा, फैजपूर, बोदवड, भडगांव, भुसावळ, यावल, रावेर
0
जिल्ह्यातील अतिवृष्टीचे तातडीने पंचनामे करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जास्त नुकसानीच्या परिसरात सरसकट पंचनामे तर आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदतीचेही निर्देश !

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले असून याचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जास्त नुकसानी झालेल्या परिसरात सरसकट पंचनामे करून आपत्तीग्रस्तांना शासकीय नियमानुसार मदत प्रदान करण्याचे निर्देशही ना.गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.

याबाबत माहिती अशी की, जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून बर्‍याच ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने चाळीसगाव आणि पाचोरा तालुक्यात पुन्हा एकदा महापूर आला असून इतर तालुक्यांमध्येही मुसळधार पावसामुळे शेतीची मोठी हानी झाली आहे. जिल्ह्यातील वाघूर, बोरी आणि अंजनी ही धरणे पूर्ण भरली असून गिरणा धरण भरण्याच्या मार्गावर आहे. या अनुषंगाने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्ह्याबाहेर असल्याने त्यांनी आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी चर्चा करून तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झाल्याचे पंचनामे करून तात्काळ मदतीचे प्रस्ताव तयार करण्यात यावेत. जिथे खूप नुकसान झाले असेल त्या परिसरात *सरसकट पंचनामे करावेत अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.* दरम्यान, अतिवृष्टीमुळे बर्‍याच ठिकाणी शेती वगळता नागरिकांची हानी झाली आहे. त्यांना शासकीय नियमानुसार तात्काळ मदत प्रदान करण्यात यावी अशा सूचना देखील पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. नुकसान झालेल्यांना शासकीय नियमानुसर भरपाई देण्यात येणार असल्याची ग्वाही ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

दरम्यान, तापी, वाघूर, गिरणा, बोरी आणि अंजनी नदीच्या काठावरील लोकांनी येत्या काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने सावध रहावे असा आवाहन देखील पालकमंत्र्यांनी केले आहे. जिल्हयात एसडीआरएफचे पथक दाखल झाले असून कुठेही आवश्यकता असल्यास तात्काळ मदत केली जाईल याची ग्वाही देखील ना. पाटील यांनी दिली आहे.

Previous Post

अतिवृष्टी झालेल्या भागात जि. प.सदस्य प्रतापराव पाटीलयांच्याकडून पाहणी

Next Post

भवरखेड्यात पावसाने घराची भिंत कोसळली

Next Post
भवरखेड्यात पावसाने घराची भिंत कोसळली

भवरखेड्यात पावसाने घराची भिंत कोसळली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्वतःच्या फायद्यासाठी वेश्याव्यवसाय : कुंटणखाना चालविणारे दांपत्यासह पाच जण ताब्यात !
क्राईम

स्वतःच्या फायद्यासाठी वेश्याव्यवसाय : कुंटणखाना चालविणारे दांपत्यासह पाच जण ताब्यात !

May 9, 2025
पोलीस पथकाला मोठे यश : आंतरराज्यीय चारचाकी वाहन चोरणाऱ्या टोळीला जेरबंद !
क्राईम

पोलीस पथकाला मोठे यश : आंतरराज्यीय चारचाकी वाहन चोरणाऱ्या टोळीला जेरबंद !

May 9, 2025
मोठी बातमी : भारताने फेटाळल्या पाकिस्तानच्या मागण्या !
क्राईम

मोठी बातमी : भारताने फेटाळल्या पाकिस्तानच्या मागण्या !

May 9, 2025
अवकाळी पाऊस आणि वादळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात पालकमंत्र्यांनी दिला धीर !
जळगाव

अवकाळी पाऊस आणि वादळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात पालकमंत्र्यांनी दिला धीर !

May 8, 2025
महत्वाची बातमी : देशातील ‘हे’ विमानतळ आदेश येईपर्यत बंद !
क्राईम

महत्वाची बातमी : देशातील ‘हे’ विमानतळ आदेश येईपर्यत बंद !

May 8, 2025
अजित पवारांसोबत जाण्याचा सुळे घेणार निर्णय : शरद पवारांची माहिती !
क्राईम

अजित पवारांसोबत जाण्याचा सुळे घेणार निर्णय : शरद पवारांची माहिती !

May 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group