Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ऐकावे ते नवलच ! जेव्हा रेल्वेची आख्खी मालगाडी गायब होते तेव्हा…
    भुसावळ

    ऐकावे ते नवलच ! जेव्हा रेल्वेची आख्खी मालगाडी गायब होते तेव्हा…

    editor deskBy editor deskFebruary 16, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी 

    सुरक्षीत तसेच शिस्तबध्द कामकाजासाठी ओळखले जाणार्या रेल्वे विभागाचा भोंगळ कारभार उघकीस आला आहे. नागपूरकडून मुंबईकडे निघालेली 90 कंटेनर असलेली मालगाडी बेपत्ता झाल्याचा प्रकार घडला आहे.

    याबाबत रेल्वे सुत्राकडून मिळालेली माहीती अशी की, 1 फेब्रुवारी रोजी निघालेली नागपूरकडून मुंबईकडे निघालेली 90 कंटेनर असलेली मालगाडी ही चार ते पाच दिवसात जेएनपीटी बंदरात पोहोचणे अपेक्षित होते. पण तेरा दिवसानंतरही ही मालगाडी जेएनपीटी बंदरात पोहोचली नाही. जणू ही गाडी चक्क गायब झाल्या सारखाच प्रकार घडला.

    FOIS मधून गाडी झाली अदृष्य…..
    नागपूरकडून मुंबईकडे निघालेली रेल्वे PJT1040201 या क्रमांकाच्या मालगाडीला 90 कंटेनर आहे. यात उच्च प्रतीचा तांदूळ, कागद, प्लास्टिकच्या वस्तू, केमिकल्स आणि इतर निर्यात करण्याच्या वस्तू आहेत. 1 फेब्रुवारी रोजी ही मालगाडी नागपूरकडून मुंबईकडे जात आहे. रेल्वेतर्फे प्रत्येक मालगाडीचे रिअल टाईम लोकशन घेतले जाते. हे लोकेशन भारतीय रेल्वेच्या फ्रेट ऑपरेशन इन्फॉर्मेशन सिस्टीम FOIS मधून घेतले जाते. भारतीय रेल्वेच्या फ्रेट ऑपरेशन इन्फॉर्मेशन सिस्टीम FOIS मधून अदृश्य झाले होते. FOIS ही रेल्वे डब्यांना लाइव मॉनिटर करण्याची भारतीय रेल्वेची यंत्रणा आहे. मात्र FOISमधून या गाडीचे लोकेशन अदृश्य झाले होते.दरम्यान एक नवखा अधिकारी आणि प्रशासनाचा भोंळग कारभारामुळे हा प्रकार घडला. दरम्यान, ही गाडी नागपूरच्या मिहान इनलँड डेपो (आयसीडी) मधून ही मालगाडी एक फेब्रुवारीला निघाली होती. पण ही मालगाडी बेपत्ता झाली नसून काही तांत्रिक कारणामुळे सेंट्रल रेल्वेच्या भुसावळ डिव्हिजनमध्ये शेगावजवळ थांबवण्यात आली होती, असे रेल्वे प्रशसनाचे म्हणने आहे. ही गाडी काल सयंकाळी ५:४० वाजता जेएनपीटीकडे रवाना झाली. दरम्यान या प्रकाराबाबत रेल्वे प्रशासनाने कमालीची गुप्तता पाळली होती

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मित्रपक्षांना वाऱ्यावर सोडणार नाही. ; मुख्यमंत्री फडणवीस !

    December 2, 2025

    बुलढाण्यात बोगस मतदानाचा आरोप; आमदारांच्या मुलाकडून पोलिसांना धमकी !

    December 2, 2025

    जळगाव जिल्ह्यात जमावबंदी लागू; 3 डिसेंबरपर्यंत कडक बंदोबस्त !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.