ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र राज्यासह जळगावकरांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागला होता. तापमानात सातत्याने वाढ होत होती. अशातच ऑक्टोंबर महिना संपल्यानंतर आता हिवाळ्याचे आगमन होत आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यासह काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. असा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्र राज्यात सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, त्याचप्रमाणे रत्नागिरीत पुढच्या दोन दिवसात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात देखील १० ते १३ नोव्हेंबर या दिवसात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Author: Team Live Maharashtra News
जळगाव शहरातील महापालिकेच्या व्यापारी संकुलातील २३६८ गाळेधारकांचा भाडेपट्टा नूतनीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. दरम्यान आमदार सुरेश भोळे यांनी शासनाकडे सततच्या पाठपुराव्या मुळे दि.१० ऑक्टोबर, २०२३ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेऊन मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस, ना. श्री. अजितजी पवार, ग्रामविकास मंत्री ना. श्री. गिरीश भाऊ महाजन आणि पालकमंत्री ना. श्री. गुलाबराव पाटील, मंत्री ना. श्री. अनिलजी पाटील यांच्या माध्यमातून गाळेधारकांच्या भाडेपट्टा निश्चित व गाळे नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला होता. त्यामध्ये गाळे धारकांना भाडे पट्टा नूतनीकरण नवीन दराची अंमलबजावणी सन २०१९ पासून करणार असल्याचा निर्णय शासनाने घेतला होता. परंतु आमदार राजुमामा यांनी भाडेपट्टा वसुली…
अहमदनगर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एसटी बसच्या चाकाखाली आल्याने एका नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मळेगाव येथील शेवगाव नगर येथे हि घटना घडली आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, श्लोक गणेश वनवे हा नऊ वर्षीय बालक घराकडून मळेगाव गावाकडे सायकलवर जात असताना याच्यासमोरून एक रिक्षा जात होती. तेव्हा श्लोक हा रिक्षाला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्नात होता याचवेळी अचानक समोरून राहुरीच्या दिशेने जाणारी शेवगाव राहुरी बस आली. दरम्यान बस चालकाला अंदाज न आल्याने श्लोकची सायकल बसच्या पुढच्या चाकाला धडकली यामुळे तो खाली पडला या धडकेत श्लोकचे डोके बसच्या चाकाखाली आले आणि त्याचा करुण अंत झाला. श्लोक…
अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघातात मृत होणाऱ्यांचे प्रमाण ही वाढले आहे. अशातच एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. कर्जत किरवली ब्रिज वरून इनोव्हा कार रेल्वे ट्रॅकवरून खाली कोसळली. दरम्यान समोरून येणाऱ्या मालगाडीची कारला धडक बसल्याने कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत सविस्तर महिती अशी कि, ही कार कर्जत येथून नेरळच्या दिशेने जात असतांना ही कार कर्जत ते नेरळच्या दरम्यान असलेल्या किरवली पुलावर आल्यावर कारचालकाचे कारवरील नियंत्रण अचानक सुटले. आणि ही कार ब्रिजवरून खाली असलेल्या पनवेल कर्जत रेल्वे मार्गावर कोसळली. मात्र त्याच वेळी तेथून एक मालगाडी जात होती. त्या मालगाडीची कारला जोरात धडक…
साहित्य पालक, टोमॅटो, बीट,मिठ, तूप, लसूण, साखर कृती सर्वप्रथम, पालक, टोमॅटो, बीट स्वच्छ धुऊन घ्या. यानंतर गॅस चालू करावा आणि कुकर ठेवून त्यात पालक, टोमॅटो व बीट घाला आणि तीन शिट्या देऊन उकडून घ्या. तीन शिट्या झाल्यानंतर कुकरमधून पालक, टोमॅटो व बीट काढा आणि त्यांना थोडं गार करून, मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि गाळणीतून गाळून घ्या. नंतर गॅसवर कढई ठेवा. त्यात दोन चमचे तूप, लसणाचे बारीक तुकडे घालून फोडणी द्यावी. थोडी लसूण फ्राय झाल्यानंतर टोमॅटो, पालक, टोमॅटो, बीट यांचे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं मिश्रण कढईत घाला. सगळ्यात शेवटी चवीपुरते मीठ, चिमूटभर साखर व मिरी पूड घाला आणि उकळेपर्यंत गॅसवर ठेवा.…
दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास मेष राशींच्या लोकांना आजचा दिवस हा चांगला असेल. आज तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी सक्रिय व्हाल. विद्यार्थ्यांना सुद्धा आजचा दिवस चांगला असेल. आरोग्य चांगले राहील. वृषभ रास वृषभ राशींच्या मंडळींना आजचा दिवस हा संमिश्र पद्दतीचा असेल. नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी तुम्हाला मिळू शकते. मुलांकडून सुवार्ता समजतील. आरोग्य चांगले राहील. मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांना आजचा दिवस आनंदात व्यतीत होईल. करिअरमध्ये चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना नफा होईल.…
राजस्थान मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. बस पुलावरुन रेल्वे ट्रॅकवर कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग 21 वर हा अपघात झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, प्रवाशांनी भरलेली हि बस हरिद्वारहून जयपूरच्या दिशेने जात होती दरम्यान बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्यामुळे बस लोखंडी रेलिंग तोडून कल्व्हर्टवरून खाली पडली. जयपूर दिल्ली रेल्वे मार्गावर बस थेट रुळावर पडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व लगेचच बचावकार्य सुरू करण्यात आले. हि घटना रविवारी मध्यरात्री 2.15 च्या सुमारास घडली. या अपघातात…
दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास मेष राशींच्या लोकांना आजचा दिवस हा लाभदायक असेल. विद्यार्थ्यांनी परीक्षेत चांगले मार्क्स मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत. आरोग्य चांगले राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वृषभ रास वृषभ राशींच्या मंडळींना आजचा दिवस हा अनुकूल असेल. उत्पनाचे नवीन स्रोत निर्माण होतील. आज गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. आरोग्य चांगले राहील. मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र पद्दतीचा असणार आहे. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली ऑफर येऊ शकते. व्यावसायिकांना…
शुक्राचे राशी परिवर्तन आज सकाळी झाले. शुक्र ग्रह भौतिक सुख आणि सुविधांचा कारक असतो असे मानले जाते. शुक्राचा या संक्रमणाचा प्रभाव हा सर्व बारा राशींवर होतो पण अशा काही राशी आहेत ज्यांना शुक्राचे संक्रमण अतिशय लाभदायी आणि भौतिक सुख सुविधांचा लाभ मिळवून देणारा ठरणार आहे. तर कोणत्या आहेत त्या राशी हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांना शुक्राचे हे संक्रमण उन्नतीचे ठरणार आहे. व्यवसायात भरभराट होईल. वास्तू खरेदीचा योग जुळून येईल. घरात सुखाचे आगमन होईल. तसेच धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. कन्या रास कन्या राशींच्या लोकांना शुक्राचे संक्रमण आनंद घेऊन येणार आहे. अनावश्यक खर्चावर…
साहित्य बासमती तांदूळ, पत्ता कोबी, शिमला मिरची, गाजर, कांदा, कांद्याची पात, आलं लसूण, हिरव्या मिरच्या, शेजवान सॉस, सोया सॉस, ग्रीन चिली सॉस. पांढऱ्या मिरची पावडर, तेल, मीठ कृती सर्वप्रथम, बासमती तांदूळ चार तास भिजवून ठेवावा त्यानंतर तांदूळ शिजवून मोकळा भात करावा. शिमला मिरची, गाजर आणि पत्ता कोबी आणि फूल कोबी बारीक चिरावी. यानंतर कढईत तेल गरम करून त्यात आलं लसूण, कांदा चांगले परतून घ्या. गाजर, शिमला मिरची, पत्ता कोबी, हिरवी मिरची टाका आणि चांगल्याने परतून घ्या. त्यानंतर त्यात शिजवलेला भात टाका आणि मिश्रण एकत्र करा. त्यात चवीनुसार मीठ टाका. त्यानंतर त्यात ग्रीन चिली सॉस, सोया सॉस आणि शेजवान सॉस टाका.…

