• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर; नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ !

user by user
June 12, 2024
in कृषी, जळगाव
0

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश !

जळगाव प्रतिनिधी | पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून बुधवारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेत विमा काढला आहे. अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

1. हिवाळ्यातील कमी तापमानाचा निकषात केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास, आता हेक्‍टरी 32 हजार 179 रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. आधीच्या निकषात ही भरपाईची रक्कम 26 हजार 500 इतकी होती.

2. एप्रिल महिन्यातील जास्त तापमानाचा निकषात पात्र झालेला शेतकऱ्यांना आता हेक्टरी 42 हजार 500 रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. ती जुन्या निकषात 35 हजार रुपये इतकी होती.

3. मे महिन्यात सलग पाच दिवस 45 अंश तापमान राहिल्यास आता नुकसान भरपाईची रक्कम 52 हजार 821 इतकी करण्यात आली आहे. ती जुन्या निकषांमध्ये 42 हजार रुपये इतकी होती.

4. तर गारपीट व वादळी पावसामुळे केळी उत्पादकांचे नुकसान झाल्यास, आता हेक्टरी 85 हजार रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे. ती जुन्या निकषांमध्ये 70 हजार इतकी होती.

शेतकऱ्यांच्या विमा हप्त्याची रक्कम झाली कमी…!

ज्या शेतकऱ्यांनी हवामानावर आधारित फळ पिक विमा काढणार आहेत त्या शेतकऱ्यांची विम्याची रक्कम देखील गेल्या वेळे पेक्षा कमी होणार आहे. 2023-24 मध्ये ही रक्कम हेक्टरी 10 हजार 500 होती. ती आता 8 हजार 500 रुपये इतकी करण्यात आली आहे.

शासन नियमानुसार नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सरकार कटीबध्द आहे. राज्य सरकारकडून बुधवारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेत विमा काढला आहे. अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईमध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
– ना. गुलाबराव पाटील, पालकमंत्री जळगाव

Previous Post

10 हजाराची लाच घेणाऱ्या निंभोरा येथील पोलीस पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहात पकडले: जळगाव एसीबीची कारवाई

Next Post

धक्कादायक : चिमुकलीवर अत्याचार करून केला खून: नराधम फरार

Next Post

धक्कादायक : चिमुकलीवर अत्याचार करून केला खून: नराधम फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

…तुम्ही सत्तेत असताना मुंबईसाठी काय केले? केंद्रीय गृहमंत्र्यांचा ठाकरेंवर निशाणा !
राजकारण

…तुम्ही सत्तेत असताना मुंबईसाठी काय केले? केंद्रीय गृहमंत्र्यांचा ठाकरेंवर निशाणा !

June 21, 2025
नाना पटोलेंचा केंद्र सरकारसह निवडणूक आयोगावर आरोप !
राजकारण

नाना पटोलेंचा केंद्र सरकारसह निवडणूक आयोगावर आरोप !

June 21, 2025
आता रेल्वे प्रवाशांची चिंता मिटणार : वेटिंग तिकिटे आता लवकर कन्फर्म होणार !
राज्य

आता रेल्वे प्रवाशांची चिंता मिटणार : वेटिंग तिकिटे आता लवकर कन्फर्म होणार !

June 21, 2025
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर राज्य सरकारची भूमिका मुख्यमंत्र्यांनी केली स्पष्ट !
कृषी

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर राज्य सरकारची भूमिका मुख्यमंत्र्यांनी केली स्पष्ट !

June 21, 2025
मुक्ताई नगर राष्ट्रीय महामार्ग भीषण अपघातात तरुण ठार !
क्राईम

मुक्ताई नगर राष्ट्रीय महामार्ग भीषण अपघातात तरुण ठार !

June 21, 2025
भरधाव चारचाकीचा थरार : महिलेचा दुर्देवी मृत्यू तर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा !
क्राईम

भरधाव चारचाकीचा थरार : महिलेचा दुर्देवी मृत्यू तर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा !

June 21, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group