• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

५१ महसूल मंडळातील पात्र शेतकऱ्यांना मिळणार ४३ हजारांची नुकसान भरपाई !- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

user by user
June 9, 2024
in कृषी, जळगाव
0
५१ महसूल मंडळातील पात्र शेतकऱ्यांना मिळणार ४३ हजारांची नुकसान भरपाई !- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

जळगाव प्रतिनिधी । यंदाचा उन्हाळा अतिशय कडक होता. यंदा मे महिन्यात सलग पाच दिवस ४५ अंशांपेक्षा अधिक तापमान होते. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वच जण अती तापमानाने हैराण झाले होते. त्याचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकांना बसला होता. केळी उत्पादकांना अती तापमानात जर सलग तीन दिवस ४५ अंश तापमान राहिले तर त्यांना नुकसान भरपाई शासन देते. यंदा तापमानाच्या निकषात जिल्ह्यातील ५१ महसूल मंडळे पात्र ठरली आहे. सलग पाच दिवस ४५ अंश तापमान राहिल्यामुळे ५१ महसूल मंडळातील केळी उत्पादक शेतकरी ४३ हजार ५०० रुपयांच्या नुकसान भरपाईच्या रक्कमेसाठी पात्र ठरले आहेत.

या आधी एप्रिल महिन्याच्या जास्त तापमानाच्या निकषात ७५ महसूल मंडळ पात्र ठरले होते. तर कमी तापमानाच्या निकषात ३६ महसूल मंडळ २६ हजार ५०० रुपयांच्या नुकसानभरपाईसाठी पात्र ठरले आहेत.

पात्र महसूल मंडळे याप्रमाणे –
जळगाव तालुक्यातील असोदा, नशिराबाद, भोकर, म्हसावद, पिंप्राळा. भडगाव तालुक्यातील भडगाव, कोळगाव. चाळीसगाव तालुक्यातील खडकी बू., शिरसगाव. धरणगाव तालुक्यातील धरणगाव, पाळधी, पिंप्री, साळवा, सोनवद. एरंडोल तालुक्यातील एरंडोल, कासोदा, रिंगणगाव, उत्राण गृह. अमळनेर तालुक्यातील अमळनेर, अमळगाव, भरवस, मारवड, नगाव, पातोंडा, शिरूड, वावडे. पाचोरा तालुक्यातील कु-हाड बु., पाचोरा. पारोळा तालुक्यातील बहादरपूर, पारोळा,शेळावे, तामसवाडी.भुसावळ तालुक्यातील वरणगाव, चोपडा तालुक्यातील चोपडा, अडावद, चहार्डी, गोरगावले, हातेड बु., लासुर. जामनेर तालुक्यातील जामनेर, नेरी बु., शेंदुर्णी. मुक्ताईनगर तालुक्यातील कु-हे, मुक्ताईनगर. रावेर तालुक्यातील ऐनपुर, खानापूर, खिर्डी बु., खिरोदा, निंभोरा बु., रावेर, सावदा.

कोट..
यंदा जिल्ह्यात प्रचंड उष्णतेची लाट होती. विशेष करुन एप्रिल व मे महिन्यात तापमान प्रचंड वाढले. मे महिन्यात तापमान ४५ अंशापर्यंत गेल्यामुळे केळीला मोठ्या प्रमाणात फटका बसला. केळीचे नुकसान झाले. सलग पाच दिवस तापमानाचा पारा ४५ अंशापेक्षा वर गेल्यामुळे जिल्ह्यातील ५१ महसुल मंडळ हवामानावर आधारीत फळ पीक विमा योजनेतंर्गत जास्त तापमानाच्या निकषात पात्र ठरली आहेत. त्यामुळे या महसुल मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ४३ हजार ५०० रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम मिळणार आहे.
– ना. गुलाबराव पाटील, पालकमंत्री, जळगाव जिल्हा

Previous Post

शेततळ्यातील कापड फाडून शेतकऱ्याचे ४० हजाराचे नुकसान

Next Post

चोरीच्या दोन दुचाकींसह दोन जणांना अटक; चाळीसगाव शहर पोलीसांची कामगिरी

Next Post
चोरीच्या दोन दुचाकींसह दोन जणांना अटक; चाळीसगाव शहर पोलीसांची कामगिरी

चोरीच्या दोन दुचाकींसह दोन जणांना अटक; चाळीसगाव शहर पोलीसांची कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप नेत्यांच्या बुडाला लागली आग ; उद्धव ठाकरेंचा पुन्हा हल्लाबोल !
क्राईम

भाजप नेत्यांच्या बुडाला लागली आग ; उद्धव ठाकरेंचा पुन्हा हल्लाबोल !

July 7, 2025
ठाकरे बंधुंनी उर्दु भाषिकांना मारुन दाखवावं ; भाजप खासदार आक्रमक !
राजकारण

ठाकरे बंधुंनी उर्दु भाषिकांना मारुन दाखवावं ; भाजप खासदार आक्रमक !

July 7, 2025
राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांना सरकार टाकणार काळ्या यादीत !
कृषी

राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांना सरकार टाकणार काळ्या यादीत !

July 7, 2025
राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा !
राजकारण

राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा !

July 7, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

महामार्गावर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार !

July 7, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

वृद्ध महिलेचा कपड्याने बांधून घरातून लांबविला मुद्देमाल !

July 7, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group