भोपाल – वृत्तसेवा । आपल्याच कुटुंबातील ७ सदस्यांना कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून करून स्वत: गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशात घडली आहे. हत्याकांड करण्याचे मागचे कारण जरी समोर आले नसले मात्र या घटनेमुळे मध्यप्रदेशात हादरा बसला आहे. विशेष म्हणजे आरोपीचे आठ दिवसांपुर्वीच लग्न झाल्याचे समोर आले आहे. पत्नी, आई, बहिण, भाऊ त्याची तीन मुलं या सर्वांनाच त्याने कुऱ्हाडीने कापून हत्या केली. ही घटन मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातीलत ग्राम बोदल कछार गावात बुधवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास ही भयानक घटना घडली. आरोपीच नाव दिनेश (वय-२७) आहे.
सर्व पीडित झोपेत असताना आरोपीने कुऱ्हाडीने हल्ला केला. नंतर स्वत:च जीवन सुद्धा संपवलं. एका आदिवासी कुटुंबात ही घटना घडलीय. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस उपस्थित आहेत. संपूर्ण गाव सील करण्यात आलय. लोकांची चौकशी सुरु आहे. बडे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचण्यासाठी रवाना झाले आहेत.
संपूर्ण गावात दहशतीच, भीतीच वातावरण आहे. वर्षभरापासून आरोपीची मानसिक स्थिती चांगली नव्हती. उपचारानंतर तो सामन्या आयुष्य जगत होता. मागच्या आठवड्यात 21 मे रोजी त्याच लग्न झालं. लग्नानंतर पुन्हा त्याला मानसिक त्रास सुरु झाला. काल रात्री त्याने पत्नी वर्षा बाई, मोठा भाऊ श्रावण, त्याची बायको बारातो बाई, आई सिया बाई, श्रावणची तीन मुल आणि लहान बहिण या सर्वांना कुऱ्हाडीने वार करुन त्याने खून केला आहे. हे सर्व घराच्या अंगणात झोपले होते. त्यावेळी आरोपीने हे कृत्य केलं. माझी मोठी बहिण बाहेर गेली होती. तिने हे पाहिल्यानंतर दिनेशकडून कुऱ्हाड काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दिनेशने तिच्या नातवावर हल्ला केला. तो जखमी झाला असून आरडाओरडा झाल्यानंतर दिनेश पळून गेला व त्यानंतर आरोपीने गळफास घेवून आत्महत्या केली.