Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कापूस व्यापाऱ्याला लुटणाऱ्या तीन दरोडेखोरांना अटक
    क्राईम

    कापूस व्यापाऱ्याला लुटणाऱ्या तीन दरोडेखोरांना अटक

    userBy userMay 28, 2024Updated:May 28, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीत दहिवद येथे १२ मे रोजी अज्ञात दरोडेखोरांनी कापूस व्यापाऱ्याला शस्त्रांचा धाक दाखवून १६ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या घटनेत कुठलेही सीसीटीव्ही फुटेज, दरोडेखोरांचे वर्णन, पुरेसे धागेदोरे उपलब्ध नसताना केवळ “क्राईम स्टडी” करून पोलिसांनी तिघा संशयितांना थेट मध्यप्रदेशातून मुद्देमालासह अटक करण्यात यश मिळविले. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी २७ रोजी सायंकाळी ५ वाजता दिली.

    चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीत दहिवद गावात १२ मे रोजी मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या दरम्यान कापूस व्यापारी धर्मराज पाटील यांच्या घरात सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून लोखंडी व लाकडी रॉडने पाटील परिवाराला मारहाण केली होती. तसेच घरातील दागिने, मोबाईल असा १६ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात कुठलाही धागा संशयितांनी ठेवलेला नव्हता. त्यामुळे आव्हानात्मक या गुन्ह्यात पोलिसांनी जुन्या गुन्ह्यांचा व भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला.

    त्यानुसार या घटनेतील मध्यप्रदेशातील भामपूर येथील अतिदुर्गम भागात पोलिसांनी जाऊन तिघांना ताब्यात घेतले. यात कालूसिंग हुजारिया बारेला (वय ५२, रा. भामपूर ता. सेंधवा जि. बडवाणी, मध्यप्रदेश), सुनील मुरीलाल बारेला (वय २१, रा. बुलवानीया ता. सेंधवा जि. बडवाणी, मध्यप्रदेश) व एक अल्पवयीन मुलगा यांना अटक करण्यात आली आहे.

    त्यांच्याकडे दागिने, बोलेरो कार, दुचाकी, दरोड्याचे साहित्य असे मिळून आले आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश वर रेड्डी यांनी सोमवारी 27 मे रोजी सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषदेत दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    user
    • Website

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.