रत्नागिरी मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गरम पाणी अंगावर पडून भाजल्याने अवघ्या तीन वर्षे चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ओवी अमर किंजले असे मयत चिमुकलीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, ओवी ही शेजारी लहान मुलांबरोबर खेळण्यासाठी गेली होती. याचवेळी खेळता खेळता तिच्या अंगावर गरम पाणी पडले. यामुळे ती भाजली होती. घरच्यांनी तिला तात्काळ संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथील आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले. मात्र तिची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने तिला तात्काळ रत्नागिरी येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
ओवी ११ नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास सिव्हील हॉस्पिटल रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात औषधोपचारापूर्वीच ओवीचा मृत्यू झाल्याचे सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरांनी घोषित केले. या चिमुकलीच्या मृत्यूमुळे वांद्री परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या मृत्यू प्रकरणाची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे